महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२सप्टेंबर) : गाय, भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गाईला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्यात यावे असे स्पष्ट मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. गाईला मूलभूत अधिकार देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत विधेयक आणावे आणि गाईला त्रास देणाऱयांना कडक शिक्षा करण्याची तजवीज करण्यात यावी असेही न्यायालयाने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील जावेद नावाच्या व्यक्तीवर राज्याच्या गोहत्या प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद सध्या अटकेत असून त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. न्या. शेखरकुमार यादव यांच्या खंडपीठासमोर हा अर्ज सुनावणीसाठी आला. यावेळी खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळून लावताना गाईविषयी स्पष्ट मत नोंदवले. गाय हा देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे गाईला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्यात यावे असे न्यायालयाने म्हटले आहे. गाईला मुलभूत अधिकार देण्यासाठी पेंद्र सरकारने संसदेत विधेयक आणले पाहिजे आणि गाईंना त्रास देणाऱयांना कडक शिक्षा करण्याची तजवीजही केली पाहिजे असेही खंडपीठाने म्हटले आहे.
गोरक्षा करण्याचे काम एखाद्या धार्मिक गटाचे नसून देशातील प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असला तरीही. गायीचे कल्याण झाले तर देशाचेही कल्याण होईल. हिंदुस्थान हा एकमेव देश असा आहे की जेथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यांची श्रद्धास्थाने वेगळी असली तरी देशाच्या संदर्भातील त्यांचा विचार मात्र समान आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे.
8 Comments