Categories: Uncategorized

डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच यापुढे मिळणार खोकल्याचं औषध ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ जुलै( : यापुढे खोकल्याचं औषध हवं असल्यास आपण औषधांच्या दुकानात जातो आणि औषधी द्रव्याची बाटली सहजपणे विकत घेऊन येतो. ही प्रथा बंद करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. यापुढे डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच खोकल्याचं औषध दुकानातून मिळू शकेल अशी तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या उपसमितीला या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यास सांगितले आहे.

औषधे तांत्रिक सल्लागार मंडळ हे देशातील औषधांसंदर्भातील सर्वोच्च सल्लागार मंडळ आहे. गेल्या महिन्यात या मंडळाची बैठक पार पडली. या मंडळाने नेमलेल्या समितीने खोकल्याच्या औषधासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठी गरजेची आहे अथवा नाही या बाबत सल्ला देण्यास सांगितले आहे. हिंदुस्थानात बनवलेल्या काही खोकल्याच्या औषधांवर इतर देशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या औषधांचे सेवन केल्याने लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

खोकल्याच्या औषधाचा देशात गैरवापर केल्याचेही प्रकार घडले आहेत. काही खोकल्याची औषधे ही अंमली पदार्थ म्हणून वापरली जात असल्याचं अंमली पदार्थ विरोधी दलाने म्हटले होते. अंमली पदार्थ विरोधी दलाने औषध नियामक संचालकांकडे ‘कोडेन’युक्त खोकल्याच्या औषधांचे प्रमाणे लक्षणीयरित्या कमी करावे अशी विनंतीही केली होती. कोडेन युक्त खोकल्याची औषधे असलेल्या फेसीडील आणि कोरेक्सविरोधात अंमली पदार्थ विरोधी दलाने जप्तीची कारवाई केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

6 days ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

2 weeks ago

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

2 weeks ago

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

1 month ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

1 month ago