महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ एप्रिल) : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना सोमवारी राज्यात ३२८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले. त्यात मुंबईतील ५१ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच २४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे, तर मुंबईतही सोमवारी ९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २८ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
५ रुग्णांना ऑक्सिजन बेड्सवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या मुंबईत १०२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून, सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या १४५४ इतकी असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षांत उन्हाळ्यात मार्च-एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले. हवामानातील बदल, विषाणूंचे बदलते स्वरूप, वाढीस पोषक वातावरण आदी कारणांमुळे संसर्ग वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मास्क वापरण्याचे, लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले जात आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…