Categories: Uncategorized

ग्राहक न्यायालयाचा बिस्किट कंपनीला दणका, पाकिटात 1 बिस्किट कमी निघाल्याने 1 लाखांचा दंड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८सप्टेंबर) : तामिळनाडूमधील जिल्हा ग्राहक मंचाने FMCG कंपनी ITCला 1 लाखाचा दंड ठोठावला आहे. सनफिस्ट मेरी लाईटच्या पॅकेटमध्ये एक बिस्किट कमी दिल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. तामिळनाडूमधील जिल्हा ग्राहक मंचाने FMCG कंपनी ITCला 1 लाखाचा दंड ठोठावला आहे. सनफिस्ट मेरी लाईटच्या पॅकेटमध्ये एक बिस्किट कमी दिल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.

यामुळे तामिळनाडूच्या जिल्हा ग्राहक मंचाने हे उत्पादन सदोष असल्याचे घोषित केले आहे. मंचाने तक्रारदाराला 1 लाख दंडासह 10,000 रुपये खटल्याच्या खर्चापोटी देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, आयटीसीला अशा कमतरतेच्या बिस्किटांच्या बॅचची विक्री न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ग्राहक मंचापर्यंत कसे पोहोचले प्रकरण :-

चेन्नई येथील रहिवासी असलेल्या दिलीबाबू यांनी भटक्या प्राण्यांना खायला देण्यासाठी मनालीतील एका विक्रेत्याकडून सनफिस्ट बिस्किटांची 25 पॅकेट खरेदी केली होती, पण जेव्हा त्यांनी ते पॅकेट उघडले तेव्हा त्यांना एका पॅकेटमध्ये फक्त 15 बिस्किटे आढळली.

यानंतर, दिलीबाबू विक्रेता आणि आयटीसीशी याबद्दल बोलले असता काही तोडगा निघाला नाही. त्यांना सांगण्यात आले की 10 रुपयांच्या नुकसानीचे वर्णन कोट्यवधींच्या नुकसानीसारखे केले जात आहे. यानंतर त्यांनी जिल्हा ग्राहक मंच गाठला.

बिस्किटांच्या पॅकेटचे वजनही कमी निघाले

कंपनीने ग्राहक मंचात असा युक्तिवाद केला की, ते बिस्किटे संख्यानुसार नव्हे तर वजनाने विकतात. यानंतर वजन केले असता ते 2 ग्रॅम कमी निघाले. पॅकेटवर वजन 76 ग्रॅम लिहिले होते, तर पॅकेजचे वजन केवळ 74 ग्रॅम असल्याचे दिसून आले. यावर उत्तर देताना आयटीसीने सांगितले की, लीगल मेट्रोलॉजी कायद्यानुसार, 4.5 ग्रॅम वजनापर्यंतची त्रुटी दंडनीय नाही.मात्र, न्यायालयाने आयटीसीचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यास नकार दिला. न्यायालयाने सांगितले की, त्रुटीचे संरक्षण केवळ अशा प्रकरणांमध्येच दिले जाऊ शकते जेव्हा उत्पादनाचे वजन कालांतराने कमी झाले.

वजनाच्या आधारे बिस्किटे विकण्याचे तर्क न्यायालयाने फेटाळून लावले

वजनाच्या आधारे पॅकेट्स विकल्या जातात, हा कंपनीचा युक्तिवादही न्यायालयाने मान्य करण्यास नकार दिला. बिस्किटांच्या पॅकेटवर हा क्रमांक स्पष्टपणे लिहिला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे ग्राहकांच्या निर्णयांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.चेन्नईचे रहिवासी असलेले तक्रारदार पी. दिलीबाबू यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, बिस्किटाच्या पॅकेटवर १६ बिस्किटांचा उल्लेख होता. परंतु पॅकेटमध्ये फक्त १५ बिस्किटे होती. अशाप्रकारे पॅकेटमधील एका बिस्किटाची किंमत ७५ पैसे होते. कंपनी दररोज बिस्किटांची ५० लाख पॅकेट बनवते. प्रत्येक पॅकेटमधून १ बिस्कीट गायब झाल्यास ग्राहकांना दररोज २९ लाखांचे नुकसान सहन करावे लागेल. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होऊन जिल्हा ग्राहक मंचाने दिलीबाबूंच्या बाजूने निकाल दिला.

तक्रारदाराने कंपनी आणि बिस्किटे विक्री करणाऱ्या दुकानाला १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यांनी अनुचित व्यापार पद्धती आणि सेवा कपातीसाठी नुकसानभरपाई म्हणून १० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराने मागणी केलेली रक्कम खूप जास्त असल्याचे मंचाने म्हटले आहे. तक्रारदाराला कंपनीला नुकसान भरपाई म्हणून १ लाख रुपये आणि कायदेशीर कारवाईचा खर्च म्हणून १०००० रुपये भरावे लागतील, असा आदेश मंचाने दिला.

 

 

Maharashtra14 News

Recent Posts

सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात जागतिक परिचारीका दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…

3 days ago

नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेजचा दहावी चा निकाल शंभर टक्के

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…

4 days ago

माॅक ड्रील- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…

1 week ago

1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्र हे नाव कसं आणि कोणामुळे मिळालं? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…

2 weeks ago