Categories: Uncategorized

दापोडी-बोपोडी रस्त्यावरील स्मशानभूमी रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना स्मशानभूमीकडे ये-जा करण्यासाठी अडचणींचा करावा लागतोय सामना

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे : यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने नागरी वस्तीत तारांबळ उडाल्याचे चित्र पिंपरी चिंचवड शरिरात ठिकठिकाणी दिसून येत आहे. दापोडी-बोपोडी रस्त्यावरील बुद्धविहार परिसरालगत असलेल्या दापोडी स्मशानभूमी रस्त्यावर पाण्याचे तळे साचत असल्याने नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे.

शहरात अनेक ठिकाणी मॉन्सून पूर्व पावसामुळे रस्त्याची दैना झाली आहे. रस्ता कामे करीत असताना मापाचे तारतम्य न बाळगल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप येत आहे. अशातच नागरिकांना अंत्यविधीसाठी ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी दापोडी येथे होत आहे.

त्यातच अडचणीत भर म्हणून परिसरात भंगार मालाची दुकाने, अस्ताव्यस्त पसरलेला कचरा, त्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा गाळ व परिसरात नियमित होत नसलेली स्वच्छता यामुळे कचरा व गाळ रस्त्यावर जमा होतो. त्यामुळे परिसराला बकालपणा आला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना अंत्ययात्रा काढावी लागते. गेली आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याने येथे डास व कीटकांचा उपद्रव वाढला. पाणी ओसरल्यावर जमा झालेल्या गाळ व कचऱ्याची स्वच्छता होत नसल्याने आरोग्याचा धोका लक्षात घेऊन येथे नियमित स्वच्छता करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. शेजारीच बुद्धविहार प्रार्थनास्थळ, मुख्य रस्त्यावर विविध दुकाने, हॉटेल आहेत.

रस्त्याला व्यवस्थित उतार नाही. यामुळे येथील पाण्याचा निचरा होत नाही. रस्ता करताना या गोष्टींकडे लक्ष दिले गेले नाही. – मनोज परदेशी, स्थानिक रहिवासी

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतच्या भव्य-दिव्य वास्तूची प्रत्यक्ष भाजप पदाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 एप्रिल :पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगत आणि आधुनिक प्रतिमेला साजेसी अशी महानगरपालिकेची नवीन…

16 hours ago

शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम .. काव्यशायराना’तून समतेचा संदेश; वसीम बरेलवी यांच्या शायरीने रंगली मैफल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ एप्रिल २०२६ – शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम…

4 days ago

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर – सभापती रविना आंगोळकर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३ एप्रिल २०२६ :* बालवाडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा…

5 days ago

रहाटणी प्रभागातील गजानन नगरमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…

1 week ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…

1 week ago