Categories: Uncategorized

या’ दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार … तर, नवीन मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ चेहर्‍यांना मिळू शकते संधी?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ मे) : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. न्यायालयाच्या निकालाने शिंदे- फडणवीस सरकारला अभय मिळाल्यानंतर आत्ता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा गेली नऊ महिने रखडलेला विस्तार आता लवकरच होणार असून, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

मे महिनाअखेरीसच हा विस्तार करून शिंदे-फडणवीस सरकार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत.

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे बोलले जात असताना, भाजपने शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातही फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना यश आले तर मंत्रिमंडळात काही जागा येणार्‍यांसाठी असाव्यात म्हणूनही त्या रिक्त ठेवल्याची चर्चा भाजपमध्ये होती. मात्र, आता भाजप-शिवसेना आपल्या जागा भरणार आहे. मेअखेरीस हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेक संभाव्या तारखा जाहीर झाल्यानंतरही विस्तार होऊ शकला नाही. तसंच, शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलल्याने महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला जोर आला आहे.

▶️नवीन मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ चेहर्‍यांना मिळू शकते संधी?

शिंदे गटातून बालाजी किणीकर, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय शिरसाट, योगेश कदम, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावर यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपमधून राणा जगजितसिंह पाटील, रणधीर सावरकर, नितेश राणे, प्रशांत ठाकूर, योगेश सागर, माजी मंत्री संजय कुटे, जयकुमार रावल, पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ, मुरबाडचे आमदार किसन कथोरे अशा चेहर्‍यांना संधी मिळू शकते.

Maharashtra14 News

Recent Posts

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

2 weeks ago

छत्रपती कारखान्याचा कारभार दोन वर्गमित्रांकडे … जाचक नवे अध्यक्ष; तर कैलास गावडे नवे उपाध्यक्ष !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…

3 weeks ago

आषाढी वारी पालखी सोहळा मार्गाची पोलीस व महापालिका प्रशासनाकडून पाहणी

: आषाढी वारी पालखी सोहळा मार्गाची पोलीस व महापालिका प्रशासनाकडून पाहणी : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या…

3 weeks ago

पिंपळे गुरव येथे हड्डी रोग निवारण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे २०२५ – पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ बॅडमिंटन हॉलमध्ये…

3 weeks ago