Google Ad
Editor Choice Maharashtra

Karad : भाजपला कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावे लागते … अजित पवार यांचा टोला

महाराष्ट्र 14 न्यूज : महाविकास आघाडीकडून राज्यात स्थापन झालेल्या सरकारला कुठलाही धोका नाही. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केली आहे. महाविकास आघाडीच्या पाठीशी जोपर्यंत या तिघांचे आशीर्वाद आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही. 105 जण निवडून येऊनही सरकार करता आले नाही, हे भाजपचे खरे दुखणे आहे. म्हणून कार्यकर्ते जपण्यासाठी त्यांना गाजर दाखवावे लागते, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी आदरांजली वाहिल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, प्रभाकर घाडगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित होते.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

125 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!