Categories: Uncategorized

मोठी बातमी! आता कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा पाच लाखापर्यंतचा इलाज होणार मोफत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० नोव्हेंबर) : प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंतचा इलाज आता आपण मोफत करणार आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. भंडारा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात महायुतीचे तिन्ही नेते एकत्र होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी कित्येक योजनांचा पाढा वाचुन दाखवला. तर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सगळ्या अटी काढून टाकल्या असुन आता रेशन कार्डाची अट नाही. उत्पन्नाची अट नाही. असं फडणवीसांनी सांगितले.

मात्र, अद्याप दोन्ही योजनांचा डोलारा अवघ्या ९९७ रुग्णालयांवर (सोलापूर जिल्ह्यातील ५० रुग्णालये) असून त्या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही सुरु न झाल्याने रुग्णांना पदरमोड करूनच महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.राज्यातील जिल्हा, उपजिल्हा, शासकीय वैद्यकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, आपला दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये सद्य:स्थितीत दरमहा दीड कोटी रुग्ण उपचार घेतात. त्या प्रमाणात त्याठिकाणी सोयी-सुविधा नसल्याचे अनेक दुर्घटनांमधून उघड झाले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयांमध्ये महागडे उपचार घेता यावेत म्हणून राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून साडेनऊशे आजारांवर तीन लाखांपर्यंत तर आयुष्यमान भारत योजनेतून एक हजार ३५६ आजारांवर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय झाला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आत्तापर्यंत आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये दोन लाखपेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे आणि तो सातत्याने रोज वाढतो आहे. त्यामुळे जे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत विविध योजना पोहचवणं त्यांना अधिक सक्षम करणं हा प्रयत्न सातत्याने आपला चाललाय. खरं म्हणजे आपला भंडारा जिल्हा हा एकीकडे निसर्ग अतिशय वैविध्यपूर्ण असा जिल्हा केलाय. हा तलावांचा जिल्हा आहे. हा जंगलांचा, वनांचा जिल्हा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेले लोकं या जिल्ह्यामध्ये आपल्याला शेतकरी पाहायला मिळतात. आणि हा धनाचा जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात याठिकाणी धानाची शेती केली जाते. मला कल्पना आहे की यावेळी काही भागामध्ये त्याठिकाणी प्रादुर्भाव झालाय. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्या ठिकाणी आमचं धान नष्ट झालं असेल त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आवश्यक ती सगळी मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातनं निश्चितपणे याठिकाणी केली जाईल. हा विश्वास मी आपलं देऊ इच्छितो हे सरकार शेतकऱ्यांना समर्पित सरकार आहे.”

Maharashtra14 News

Recent Posts

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात काय दिले : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प२०२५ चे ठळक मुद्दे

*महाराष्ट्राच्या #अर्थसंकल्प२०२५ चे ठळक मुद्दे:* *विकसित भारत-विकसित महाराष्ट्र.* महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१० मार्च : महाराष्ट्र…

1 day ago

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट मंडळाच्या वतीने 8 मार्च 2025 जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

महाराष्ट्र 4 न्यूज, दि.०८ मार्च : कोणत्याही स्त्रीला तिच स्वातंत्र्य देण, समान वागणुक देण, तिच्या…

2 days ago

वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या कीर्तनाने रचला सोहळ्याचा पाया जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर महोत्सव

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ मार्च :  जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त…

2 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण... : चिंचवड येथील…

3 days ago