महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ ऑगस्ट) : भारताला स्वतंत्र होऊन आज १५ ऑगस्ट २०२१ रोजी ७४वर्ष पूर्ण झाली आहेत. देशात मोठ्या उत्साहात ७५ वा स्वांतत्र्य दिन साजरा केला जातोय. देशातील कानाकोपऱ्यात कोरोना नियमांचे पालन करुन देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव मधील विनायक नगर अहिल्यादेवी होळकर पथ, येथेही राजेंद्र शंकर राजापुरे (मा. स्थायी समिती अध्यक्ष, पिं.चिं. म. न. पा), सौ. माधवी राजापुरे (नगरसेविका, पिं.चिं. म. न. पा), अंबरनाथ कांबळे (नगरसेवक) शिवाजी पाडुळे व प्रज्ञा दिवेकर (पत्रकार) यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
तसेच ‘अहिल्यादेवी होळकर पथ’ दर्शक फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मगण सावंत यांनी केले व सौ. श्वेता विशाल गणगे यांनी रांगोळी रेखाटन केले. परिसरातील विकासकामे या विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते शंकरराव गणगे, संजय यादव, सुखदेव चोरमले, निकाळजे, जगताप, जयकर, पवार, माऊली पाचरूपे व सर्व रहिवासी कोरोनाच्या नियमांचे पालन करत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4 Comments