महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ मे) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेकरिता एसटी महामंडळाने वारकऱ्यांसाठी राज्यभरातून पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने पंढरपूर यात्रेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी घेतला, त्या वेळी त्यांनी वारीसाठी पाच हजार विशेष बस सोडण्याचे निर्देश दिले. याव्यतिरिक्त वाखरी येथील २७ जूनला होणाऱ्या माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २०० अतिरिक्त बसही उपलब्ध केल्या जाणार आहेत. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे; तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूप घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
या बैठकीस राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी सुमारे पाच हजार गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीतर्फे करण्यात आले आहे. मराठवाड्यातून १२००, मुंबई प्रदेशातून ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १०००; तर अमरावती येथून ७०० विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
भाविकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, आयटीआय महाविद्यालय आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. यात्राकाळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालये, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या विशेष एसटी गाड्या २५ जून ते ५ जुलै यादरम्यान धावणार असून वाखरी येथील माउलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २०० अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ८ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव काळात पिंपरी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 04 सप्टेंबर :- सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी,…
महाराष्ट्र 14न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आझाद मैदानी…