महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ जुलै) : कोरोना साथीच्या आजारामुळे अनेक रुग्णालयात रक्तपेढीतील रक्त साठा कमी झाला आहे. या कठीण काळात, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक आणि रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. कारण रक्ताची पूर्तता केवळ रक्तानेच शक्य आहे. रक्तपेढीमध्ये रक्त असल्यासच रुग्णाला वाचवता येते.
थॅलेसीमियाने ग्रस्त अनेक मुले आहेत. त्यांना दररोज सुमारे 10 युनिट रक्ताची आवश्यकता असते, तसेच अनेक आजार, अपघाती, आणीबाणीच्या प्रकरणांसह आणि इतरांनाही दररोज रक्ताची आवश्यकता असते. रक्ताची कमतरता लक्षात घेऊन या कठीण परिस्थितीत मुलांना व गरजूंना मदत करण्यासाठी पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, त्याला अनेक रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
राजमाता जिजाऊ उद्यान ग्रुप तर्फे पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले . याप्रसंगी ग्रुपमधील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिरासाठी पिंपरी येथील पी एस आय रक्तपेढी च्या डॉक्टरांनी सहकार्य केले . आयोजनामध्ये प्रसाद जाधव आणि मुन्ना भाई आणि अन्य सदस्यांनी हिरीरीने सहभाग घेतला . डॉक्टरांनी रक्तदान करणे का महत्वाचे आहे त्याच्याबद्दल माहिती दिली समारोप प्रा . उमेश बोरसे यांनी केला .
8 Comments