Categories: Uncategorized

बिहार प्रमाणे राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करावी” राजसाहेब राजापूरकर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग महाराष्ट्र

“बिहार प्रमाणे राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करावी” राजसाहेब राजापूरकर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग महाराष्ट्र

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि ०९ नोव्हेंबर) :- नुकतीच बिहार मध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना पार पडली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी.

देशातील अनुसुचित जाती व जमातींची जातवार जनगणना करून दीडशे वर्षे होत आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन इतर मागासवर्गीय (ओबीसी) वंचित राहिले. सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यादा पटवून दिले. सन २०१० च्या ५ मे ला संसदेत राष्ट्रवादीचे नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ, स्व.गोपीनाथराव मुंडे यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यासाठी देशाचे नेते सन्मा. श्री शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रयत्न केले गेले होते. त्यातुन २०११ ते २०१४ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना (SECC 2011) केली. मात्र त्याची आकडेवारी राज्यांना दिली गेलेली नाही.

देशात सन २०२१ सालच्या नियमित जनगनणेचे काम अद्याप व्हायचे आहे. त्यात ही जातनिहाय गणना करावी अशी आमची सातत्याने मागणी आहे. तरी, बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जातीनिहाय जनगणना करावी,अशी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर साहेब आणि तसेच तमाम ओबीसी संघटनांची मागणी आहे. या मागणीचा गांभिर्याने विचार करत जातीनिहाय जनगणना करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करावी ही निवेदन देण्यात आले सदर निवेदन तहसीलदार उज्वला निकम यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे शहर अध्यक्ष भाई विशाल जाधव, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष विशाल क्षीरसागर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रवक्ता राहुल नेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश हरगुडे, ओबीसी सेलचे भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष माळी, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, नारायण भागवत, संतोष कदम,माधव पाटील,संदिप चव्हाण, काशिनाथ नखाते, सचिन निंबाळकर आदि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Maharashtra14 News

Recent Posts

आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी … नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA), या डॉक्टर्स असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड शाखेने उचलले प्रेरणादायी पाऊल !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…

4 hours ago

पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी : जिममध्ये आला व्यायाम केला, पाणी पिताच …

महाराष्ट्र 14 न्युज, दि.02ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, व्यायाम…

16 hours ago

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड मनपाच्या वायसीएम रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १ ऑगस्ट २०२५ :* जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव…

18 hours ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये ‘स्पंदन’ उपक्रमाची सुरुवात! … ६० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य शिक्षणाचा लाभ मिळणार

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १ ऑगस्ट २०२५:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्यांचा…

1 day ago

️ पिंपरी चिंचवडकरांनो, महाराष्ट्र14 न्यूज टॉपच्या घडामोडी नक्की वाचा!

  महाराष्ट्र 14 न्यूज :- 01 ऑगस्ट 2025 ️ पिंपरी चिंचवडकरांनो, 'महाराष्ट्र14 न्यूज' टॉपच्या घडामोडी…

1 day ago

अवघ्या विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांचा १५ ऑगस्ट रोजी सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव राज्यभरात साजरा केला जाणार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि, 01 ऑगस्ट -- ज्ञानेश्वर महाराज यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव १५…

1 day ago