महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : उन्हाळा आला की ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या जातात. माणसाची तहान भागावी यासाठी हा खटाटोप केला जातो. परंतु या रखरखत्या उन्हात मुक्या पक्ष्यांचे काय हाल होत असतील ? नेमक्या याच जाणिवेतून नवी सांगवी येथील ओम साई ट्रस्ट आणि नवनाथ जगताप मित्र परिवार यांच्या संकल्पनेतुन पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी मोफत मातीची भांडी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे पक्षीप्रेमी तसेच सर्व नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. माणसाला जशी पाण्याची नितांत गरज आहे, तशी येथील प्राणी-पक्ष्यांनाही त्याची गरज आहे. माणसाला पाणी सहज उपलब्ध होते. परंतु पक्षांना त्यासाठी वनवन भटकावे लागते. पाण्यासाठी पशुपक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. शहरी भागात चिमण्या तसेच अन्य पक्षी पाण्याच्या शोधात नागरिकांच्या घराजवळ येत असतात. याचा विचार करत नवनाथ जगताप मित्र परिवारातर्फे पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याकरिता नागरिकांच्या मागणीनुसार मातीची भांडी घर पोहोच करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
उन्हाळ्यात अंगाची होणारी लाहीलाही आणि त्यात पाण्याची टंचाई बघून जीव अगदी कासावीस होतो. उन्हापासून बचाव व्हावा यासाठी पंखा, एसी, कुलर आदींचा आपण आधार घेतो. किंबहुना आपण या सोयीसुविधांमुळे आरामदायी जीवन जगत असतो. पण मुकी जनावरे, पक्षी यांचे उन्हाळ्यात पाण्याअभावी खूप हाल होत असतात अनेक पक्षी पाण्याच्या शोधात भटकतात. बऱ्याचदा हे पक्षी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडेही येतात. उष्णतेमुळे कासावीस झालेल्या या पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवावे. घराची बाल्कनी, टेरेस येथे पाणी ठेवण्यासाठी मातीची भांडी नागरिकांना उपलब्ध करून मिळतील. असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…