Categories: Uncategorized

पक्षांची तहान भागवण्यासाठी, नवी सांगावीतील ‘ओम साई ट्रस्ट’च्या वतीने स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : उन्हाळा आला की ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या जातात. माणसाची तहान भागावी यासाठी हा खटाटोप केला जातो. परंतु या रखरखत्या उन्हात मुक्या पक्ष्यांचे काय हाल होत असतील ? नेमक्या याच जाणिवेतून नवी सांगवी येथील ओम साई ट्रस्ट आणि नवनाथ जगताप मित्र परिवार यांच्या संकल्पनेतुन पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी मोफत मातीची भांडी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे पक्षीप्रेमी तसेच सर्व नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. माणसाला जशी पाण्याची नितांत गरज आहे, तशी येथील प्राणी-पक्ष्यांनाही त्याची गरज आहे. माणसाला पाणी सहज उपलब्ध होते. परंतु पक्षांना त्यासाठी वनवन भटकावे लागते. पाण्यासाठी पशुपक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. शहरी भागात चिमण्या तसेच अन्य पक्षी पाण्याच्या शोधात नागरिकांच्या घराजवळ येत असतात. याचा विचार करत नवनाथ जगताप मित्र परिवारातर्फे पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याकरिता नागरिकांच्या मागणीनुसार मातीची भांडी घर पोहोच करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

उन्हाळ्यात अंगाची होणारी लाहीलाही आणि त्यात पाण्याची टंचाई बघून जीव अगदी कासावीस होतो. उन्हापासून बचाव व्हावा यासाठी पंखा, एसी, कुलर आदींचा आपण आधार घेतो. किंबहुना आपण या सोयीसुविधांमुळे आरामदायी जीवन जगत असतो. पण मुकी जनावरे, पक्षी यांचे उन्हाळ्यात पाण्याअभावी खूप हाल होत असतात अनेक पक्षी पाण्याच्या शोधात भटकतात. बऱ्याचदा हे पक्षी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडेही येतात. उष्णतेमुळे कासावीस झालेल्या या पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवावे. घराची बाल्कनी, टेरेस येथे पाणी ठेवण्यासाठी मातीची भांडी नागरिकांना उपलब्ध करून मिळतील. असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतच्या भव्य-दिव्य वास्तूची प्रत्यक्ष भाजप पदाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 एप्रिल :पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगत आणि आधुनिक प्रतिमेला साजेसी अशी महानगरपालिकेची नवीन…

16 hours ago

शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम .. काव्यशायराना’तून समतेचा संदेश; वसीम बरेलवी यांच्या शायरीने रंगली मैफल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ एप्रिल २०२६ – शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम…

4 days ago

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर – सभापती रविना आंगोळकर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३ एप्रिल २०२६ :* बालवाडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा…

5 days ago

रहाटणी प्रभागातील गजानन नगरमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…

1 week ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…

1 week ago