Google Ad
Editor Choice Pune

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं, म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३जुलै) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (०२जुलै) पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यात त्यांनी नुकताच झालेला महापौरांच्या निमंत्रणावरील वादावरही भाष्य केलं. ‘पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांचा मान असतो. मी स्वतः पुण्याचा नागरिक आहे. त्यामुळे यापुढे असं होणार नाही,’ असं आश्वासन अजित पवार यांनी यावर दिलंय. तसेच मुंबईतील बैठकीचं निमंत्रण मी स्वतः महापौरांना दिलं होतं, असंही त्यांनी नमूद केलं.

अजित पवार म्हणाले, ‘मुंबईतील बैठकीला मी स्वतः महापौरांना बोलवलं होतं. मात्र बातम्या वेगळ्या आल्यात. आज त्यासंदर्भात माझी महापौर आणि माझी चर्चा झाली. प्रथम नागरिक या नात्याने महापौरांचा मान असतो. त्यासंदर्भात काही गैरसमज झालेत. यापुढे असं होणार नाही असा आदेश प्रशासनाला दिला आहे. मी पुण्याचा नागरिक आहे. त्यामुळे यापूढे असं होणार नाही.

अजित पवार म्हणाले, ‘मागच्या बैठकीला ऑफिसच्या कामामुळे मला येता आलं नाही. दुर्दैव असं की एखादी बैठक टाळली तर लगेच चर्चा वेगळी होते. आंबिल ओढ्याच्या तोडकामासंदर्भात जी चर्चा झाली, त्याबाबत माझा काही संबध नाही. यामध्ये बऱ्याचदा राजकारण आणलं जातंय.

Google Ad

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!